स्वातंत्र्यदिन साजरा झाल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी सकाळी ११ वाजता संपूर्ण राज्यात सामूहिक राष्ट्रगान करण्याची घोषणा केली आहे. स्वराज्य महोत्सवाचा भाग म्हणून हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक सचिव सौरव विजय यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे.
सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी यांना या उपक्रमात सहभागी होणे सक्तीचे आहे. सामूहिक राष्ट्रगान म्हणताना त्याचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, याकडे लक्ष द्यावे.