
मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये आग लागली आहे. ही आग रविवार रात्री ३ वाजता लागली असून, ११ तास होऊन देखील अद्याप ही आग विझलेली नाही. मसाला मार्केट मधील एच विंग गाळा २३, कुलस्वामी फूड्समध्ये रविवारी रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. त्याठिकाणी गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्ता हा सुकामेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला होता.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठ असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी गाळ्यात प्रोसेसिंग सूरु असल्याने आग लागली आहे. आतापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या १३ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील अनधिकृतपणे साठा करून ठेवण्यात आलेल्या ड्राईफ्रुट्स मुळे ही आग लागली आहे. त्याठिकाणी गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्ता हा सुकामेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला होता.