उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी हे मागील दोन वर्षांपासून कोविड आकस्मिक अभिवचन रजेवर उल्हासनगर शहरात वावरत आहेत. कोविड महामारी समाप्त झाल्याने सर्व कैद्यांना पुन्हा कारागृहात येण्याचे आदेश राज्याच्या गृह सचिवांनी काढल्याने पप्पू कलानी पुन्हा येरवडा तुरुंगात जाणार का ? या चर्चाना शहरात उधाण आले आहे.
२७फेब्रुवारी१९९०ला विधानसभा निवडणुकीच्या वेळी बोगस मतदानावरून भाजपानेते घनश्याम बठीजा आणि पप्पु कालानी यांच्यात बोलाचाली झाली होती. या वादातुनच त्याच दिवशी सांयकाळी घनश्याम बठी जाहे पिंटोपार्क येथे बाहेर उभे असताना झालेल्या गोळीबारात त्यांची हत्या झाली होती. ही हत्या पप्पु कलानी यांनी केल्याची फिर्याद घनश्यामयांचे भाऊ इंदरयानी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली होती. तसेच पोलीस सरंक्षणाची मागणी ही केली होती. मात्र पोलीस सरंक्षण असून सुध्दा २९एप्रिल१९९० साली इंदर हे पिंटोपार्कमध्ये असताना बाबागॅब्रियल, बच्चीपांडे, श्याम किशोरगरीकापट्टी, हर्षद आणि रिचर्ड यानी इंदरयांची निघृणहत्या केली होती. हया दोन्ही प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार म्हणुन पप्पू कलानी यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता.