
मुंबई : अयोद्धेतील भव्य राममंदिराचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातून लाखो भाविक तेथे एकत्र होणार आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासात २००२ साली गुजरातच्या गोध्रा स्थानकात घडलेल्या घटनेप्रमाणे एखादी घटना घडू शकते अशी शक्यता उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केली. सरकार मोठ्या प्रमाणात बस आणि ट्रक भरुन भाविकांना बोलावण्याची शक्यता आहे.
मात्र त्यांच्या परतीच्या प्रवासात गोध्रासारखा प्रसंग उद्भवू शकतो असे उद्धव ठाकरे रविवारी जळगाव येथे म्हणाले आहेत.