
सहाव्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील तेजी रोखली गेली. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी पुन्हा विक्रीचा मारा केल्याने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याचा बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्समध्ये ३०६ अंकांनी घट झाली.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३०६.०१ अंक किंवा ०.५५ टक्के घसरुन ५५,७६६.२२ वर बंद झाला. दिवसभरात तो ५३५.१५ अंक किंवा ०.९५ ५५,५३७.०८ ची किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८८.४५ अंक किंवा ०.५३ टक्के घसरुन १६,६३१.०० वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा समभाग सर्वाधिक ३.८० टक्के घसरला. त्यापाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीज ३.३१ टक्के घसरला कारण कंपनीने जूनला संपलेल्या तिमाहीचा जाहीर केलेला निकाल गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करु शकला नाही. घसरणलेल्या झालेल्या अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा आणि नेस्ले यांचा समावेश आहे. याशिवाय, टाटा स्टील, इंडस्इंड बँक, एशियन पेंटस्, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रो आणि एनटीपीसी यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये घसरण तर सेऊलमध्ये वाढ झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.२४ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव १०४.५२ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ६७५.४५ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.