
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उदयास येणाऱ्या नवीन शक्ती समीकरणांमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी शक्यता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार बाळा नांदगावकर यांनी वर्तविली आहे.
नांदगावकर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, पक्षाची भूमिका उत्तर प्रदेश, बिहार किंवा इतर राज्यातील लोकांच्या विरोधात नव्हती आणि त्यांच्या मागील आंदोलनामुळे शिवडी मतदारसंघात कोणाचेही नुकसान झाले नाही, असे प्रतिपादन केले.
मनसे आणि पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोघेही पुढच्या काळात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरतील, असे त्यांनी सांगितले. नांदगावकर यांनी चार वेळा प्रतिनिधित्त्व केले आहे. तर त्यांचे स्पर्धक विद्यमान आमदार शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अजय चौधरी आहेत. चौधरी यापूर्वी दोन वेळा निवडून आले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चौधरी यांनी नांदगावकर यांचा पराभव केला होता.
परप्रांतीयांबद्दल आम्हाला आदरच
नांदगावकर म्हणाले की, उत्तर भारतीयांनी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सर्वांचा आदर करतो. पक्षाची भूमिका यूपी, बिहार किंवा इतर राज्यातील लोकांच्या विरोधात नव्हती आणि त्यांच्या मागील आंदोलनामुळे मतदारसंघातील कोणाचेही नुकसान झाले नाही. पिढ्यानपिढ्या शहरात राहणाऱ्यांकडे सुविधा या आधी आणि नंतर त्या इतरांना मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका आहे.