

मुंबई : मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’वरील (सीएसएमआयए) दोन्ही धावपट्ट्या ७ मे २०२६ रोजी पावसाळापूर्व देखभालीसाठी सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११.०० ते संध्याकाळी १७.०० या वेळेत मुख्य धावपट्टी आणि दुय्यम धावपट्टीवरून कोणतीही उड्डाणे होणार नाहीत.
पावसाळ्याच्या काळात विमान प्रवास अधिक सुरक्षित व्हावा आणि तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी दरवर्षी ही देखभाल मोहीम राबवली जाते. या नियोजित कामामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच एअरलाईन्स आणि इतर घटकांशी समन्वय साधला आहे, जेणेकरून त्यांना आपल्या विमान वेळापत्रकात योग्य बदल करता येतील.
या सहा तासांच्या कालावधीत १०३३ एकरमध्ये पसरलेल्या एअरसाइड इन्फ्रास्ट्रक्चरची बारकाईने पाहणी केली जाईल. पावसाळ्यात विमानांचे सुरक्षित टेक-ऑफ आणि लँडिंग करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.