

मुंबई : पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून राजकारणात ही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात सर्वाधिक ८७९ महिला उमेदवार असून देवनार, मानखुर्द, चेंबूर, शिवाजी नगर, गोवंडी या प्रभागातून तब्बल ६८ महिला उमेदवार आपले राजकीय नशीब आजमवत आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपलेइ उमेदवार निवडणु-कीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना प्राधान्य दिले असून महिला उमेदवार ही रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २ जानेवारी शेवटची तारीख होती. २ जानेवारीपर्यंत ४५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात पुरुष २२० तर २२३ महिलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबईत १७०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु १७०० पैकी ८७९ महिला उमेदवार असून ८२१ पुरुष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
मुंबईत २२७ प्रभागात निवडणु-कीचा सामना रंगणार असून २२७पैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या जादा असल्याने मुंबईत महिला राज असणार आहे.