

मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेले तब्बल २ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १ हजार ६६५ मोबाईल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. हे मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गर्दीचा फायदा घेत चोरांकडून लोकल, मेल एक्स्प्रेसमधून प्रवाशांचे मोबाईलचोरांकडून लंपास करण्यात येतात. गेले काही वर्षांत चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी पदभार स्वीकारल्यापासून रेल्वे गुन्हेगारी, विशेषतः मोबाईल
चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. वर्ष २०२४, २०२५ आणि जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या छडा गुन्ह्यांचा लावण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या विविध पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने 'विशेष शोध मोहीम-३' अंतर्गत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेत १ हजार ६६५ मोबाईल शोधण्यात आले. हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण बाजारपेठ किंमत २.४९ कोटी रुपये आहे. चोरीनंतर महाराष्ट्राबाहेर गेलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित राज्यांच्या पोलिसांसोबत समन्वय साधला जात आहे.