मुंबईतील १४ विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात; तानसा जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.
मुंबईतील १४ विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात; तानसा जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती
मुंबईतील १४ विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात; तानसा जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.

तानसा धरणातून भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याकामी काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्‍यक आहे. या कामकाजामुळे भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्‍के घट होणार आहे. ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in