मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा आणि काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे...
मुंबईकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी अंधेरी, BKC, धारावीसारख्या महत्त्वाच्या भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद; जपून पाणी वापरा - BMC
Published on

मुंबई : मुंबईतील के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे. परिणामी, के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. ही कामे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे.

BMC कडून आवाहन

यासाठी के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in