आता दादरऐवजी परळवरून १२ गाडया सुटणार

दादरच्या फलाट एकची रुंदी वाढवली जाणार आहे
आता दादरऐवजी परळवरून १२ गाडया सुटणार

मुंबई : दादर रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. यातील गर्दी कमी करायला दादरहून सुटणाऱ्या १२ गाड्या परळवरून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

दादरहून रोज २.५ लाख प्रवासी प्रवास करतात. दादरमधील गर्दी कमी करायला १२ गाड्या दादरहून परळहून सोडण्याचा निर्णय घेतला. या गाड्या सध्या दादरच्या फलाट क्रमांक दोन वरून सुटतात.

तसेच दादरच्या फलाट एकची रुंदी वाढवली जाणार आहे. सध्या ती ७ मीटर असून ती १०.५ मीटर केली जाणार आहे. यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प दोन महिन्यात पूर्ण होईल.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, या फलाटाची रुंदी वाढवल्याने तेथे नवीन एक्स्लेटर बसवता येऊ शकतील. तसेच पुलाचा विस्तार होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in