
मुंबई : वातावरण बदलाचा मोठा फटका जगभरात बसत आहे. याचे मोठे परिणाम दैनंदिन तापमानावर होताना दिसत आहेत. मुंबई व उपनगरातील तापमानात १३ अंशांपर्यंत फरक दिसत आहे. हा फरक तज्ज्ञांनाच चक्रावणारा असून त्याचे परिणाम मुंबईकर व उपनगरातील नागरिकांवर होऊ शकतात. ‘रिस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या स्टार्टअपने मुंबई व उपनगरातील हवामान बदलाचा अभ्यास केला.
१ ते २२ दरम्यान वसई (प.) व घाटकोपर येथील सरासरी तापमान अनुक्रमे ३३.५ व ३३.३ अंश नोंदवले गेले, तर पवई या हरित भागातीलतापमान २०.४ अंश होते. एकाच शहरातील दोन भागातील तापमानात जवळपास १३ अंशाचा फरक आढळला. भरपूर शहरी क्षेत्र आणि शहराचे कमी विकसित किंवा हिरवे भाग यांच्यातील तापमानातील लक्षणीय फरक जाणवत आहे. उष्णता टिकवून ठेवणाऱ्या काँक्रीट इमारती आणि रस्ते, वनस्पतींचा अभाव आणि स्थानिक प्रदूषण पातळी प्रामुख्याने तापमानातील फरक वाढवतो.