व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करून दागिने पळविले

गुन्हेगारांना अवघ्या तीन तासांत एल. टी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने केली अटक
व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करून दागिने पळविले

मुंबई : व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करून घातक शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिन्याचे पार्सल पळविणाऱ्या तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अवघ्या तीन तासांत एल. टी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. निलेश हरिहर तिवारी, अभिराज अशोक खिलारी आणि सिल्वराज ऊर्फ काला सिल्व्हा वेलुतंबी पिल्ले अशी या तिघांची नावे आहेत. या आरोपींकडून ३३ लाख ४५ हजाराचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार व्यापारी असून, त्यांचा सोन्या-चांदीचे दागिन्याचे पार्सल विविध ठिकाणी पोहचविण्याचा व्यवसाय आहे. मंगळवार, २७ जूनला ते त्यांच्या सहकार्‍यासोबत दागिन्यांचे पार्सल पुणे, कोल्हापूर येथील पार्टीला देण्यासाठी कारमधून जात होते.

यावेळी त्यांच्या कारला अडवून तिघांनी त्यांच्याकडे २५ हजाराच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर या तिघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून दागिन्याचे पार्सल घेऊन पलायन केले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना देऊन तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी खंडणीसह लुटमारीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in