मुंबईकरांची वर्षभराची तहान भागली; धरणातील पाणीसाठ्यात झाली वाढ

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो
मुंबईकरांची वर्षभराची तहान भागली; धरणातील पाणीसाठ्यात झाली वाढ

जून महिन्यात धरणक्षेत्राकडे पाठ फिरवलेल्या पावसाने जुलै महिन्यापासून धरणक्षेत्रात दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून १८ ऑगस्टपर्यंत सातही धरणात १३ लाख ८८ हजार ५२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गुरुवार १८ ऑगस्टपर्यंत सातही धरणात ९५.९० टक्के पाणी साठा जमा झाला असून हा पाणीसाठा पुढील वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल, इतका उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागली असून वर्षभराची चिंता मिटली आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून महिन्यात वरुणराजाने पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. सातही धरणात ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने २७ जून रोजी १० टक्के पाणीकपात जाहीर केली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून धरणक्षेत्रात वरुणराजाची कृपादृष्टी झाली अन् पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे १२ दिवसांतच १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली. धरणांत पावसाने इनिंग सुरू केल्याने आतापर्यंत मोडक सागर १३ जुलै, तानसा १४ जुलै व तुळशी १६ जुलै रोजी हे तिन्ही तलाव ओव्हरफ्लो झाले असून सध्यस्थितीत ९५.९० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला असून हा पाणीसाठा सप्टेंबर २०२३ पर्यंत पुरेल इतका जमा झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in