बोरिवलीतील दोन जीर्ण इमारती आता सोसायटीच पाडणार

बोरिवलीतील दोन जीर्ण इमारती आता सोसायटीच पाडणार

राहणाऱ्या तीन कुटुंबांनी आधीच इमारत रिकामी केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बोरिवली पश्चिम येथील ओम श्री गीतांजली नगर सोसायटीतील दोन जीर्ण इमारती आता सोसायटीच पाडणार आहेत. इमारत पाडण्यासाठी सोसायटीने कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून आता हा परिसर बॅरिकेड करण्यात आला आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

पालिकेने धोकादायक घोषित केलेली चार मजली इमारत शुक्रवारी कोसळली. त्यात राहणाऱ्या तीन कुटुंबांनी आधीच इमारत रिकामी केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर एका दिवसानंतर पालिकेने कंपाऊंडमधील इतर तीन जीर्ण इमारतींपैकी एक पाडली. उर्वरित दोन इमारती पाडण्यासाठी सोसायटीला २४ तासांची मुदत देण्यात आली होती.

बीएमसीने २०२०मध्ये कोसळलेली इमारत धोकादायक घोषित केली होती, तर सोसायटीने नियुक्त केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटरने इमारत दुरुस्तीयोग्य असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे ते टीएसीकडे पाठवण्यात आले, त्यांनीही इमारत धोकादायक घोषित केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in