
बंगळुरू : कर्नाटकातील चिकबल्लापूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी चित्रावती ट्रॅफिक पोलीस ठाण्यासमोर घडली.
मृतांमध्ये ८ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर एक टँकर उभा होता. या टँकरला मागून येणाऱ्या टाटा सुमोने धडक दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. दाट धुके असल्याने कारचालकाला रस्त्याच्या बाजूला असलेला टँकर दिसू शकला नाही. या दुर्घटनेत टाटा सुमोतील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर चिक्कबल्लापूर जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.