

नवी दिल्ली : आपल्या सरकारची गेल्या १२ वर्षांची कारकीर्द ही ‘विश्वास, विकास आणि जनकल्याणासाठी समर्पित’ राहिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, १४० कोटी जनतेचे आशीर्वाद आणि ‘राष्ट्र प्रथम' (नेशन फर्स्ट) या भावनेच्या जोरावर आम्ही आमचे तरुण, महिला आणि शेतकरी बंधू-भगिनींना सक्षम बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
आमच्या अथक परिश्रमांचाच हा परिणाम आहे की, पायाभूत सुविधांपासून ते डिजिटल क्रांतीपर्यंत देशाने आज जगभरात एक नवी ओळख निर्माण केली आहे.
एका विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सेवा, सुप्रशासन आणि समृद्धीच्या या मार्गावरून अविरतपणे पुढे जात राहू, असेही त्यांनी म्हटले आहे.