आसाममधील पुरातील मृतांची संख्या १०० वर

आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या वर्षातील पुरामुळे प्राण गमावणाऱ्यांची एकूण संख्या १०० वर पोहोचली आहे.
आसाममधील पुरातील मृतांची संख्या १०० वर
आसाममधील पुरातील मृतांची संख्या १०० वर
Published on

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने या वर्षातील पुरामुळे प्राण गमावणाऱ्यांची एकूण संख्या १०० वर पोहोचली आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोलाघाट आणि कर्बी आंगलोंग जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सध्या चराईदेव, दरंग, गोलाघाट, जोरहाट, कर्बी आंगलोंग, नगाव आणि शिवसागर या जिल्ह्यांतील १,३७,५०० हून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

गोलाघाट जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून तेथे सुमारे ७० हजार जण प्रभावित झाले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in