'अग्निपथ' योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका; केंद्र सरकारला दिलासा

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
'अग्निपथ' योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका; केंद्र सरकारला दिलासा
@ANI

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी अग्निपथ भरती योजनेविरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने म्हंटले आहे की, या प्रकरणात दखल घेण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही. या योजनेचे उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे, हे आहे आणि ते देशाच्या हिताचे असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हंटले आहे. तसेच, जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची याचिका फेटाळत ही मागणी न्याय्य नसल्याचे सांगितले आहे.

अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उच्चं न्यायालयाने या याचिका लवकरात लवकर निकालात काढाव्यात, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in