तिसरा मुलगाच झाला म्हणून बापाकडून मुलाची हत्या

पतीचा हा अवतार पाहून पत्नी घरातून बाहेर निघून गेली होती. मात्र, काही वेळानंतर घरात आल्यावर तिने पाहिले
तिसरा मुलगाच झाला म्हणून बापाकडून मुलाची हत्या

भोपाळ : मुलगाच हवा म्हणून स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे नवी नाहीत, पण मुलगी हवी असताना मुलगा झाला म्हणून पित्याने नवजात मुलाचा खून केल्याची घटना मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात घडली आहे. दारूच्या नशेत या पित्याने आपल्या १२ दिवसांच्या बाळाचा गळा आवळून खून केला. बैतुल जिल्ह्यातील कोतवाली तालुक्यातील बज्जारवाड गावात अनिल उईके यांच्या पत्नीला आधी दोन मुले आहेत. तिसऱ्या वेळीही तिला मुलगाच झाल्याने तो निराश झाला. या नैराश्यातून मुलाच्या जन्मानंतर राग अनावर झालेल्या अनिलने पत्नीला मारहाण करत, तिच्याकडून आपल्या १२ दिवसांच्या मुलाला ओढून घेतले. पतीचा हा अवतार पाहून पत्नी घरातून बाहेर निघून गेली होती. मात्र, काही वेळानंतर घरात आल्यावर तिने पाहिले

logo
marathi.freepressjournal.in