

रायपूर : रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने अशा वाहन मालकाच्या बाजूने निर्णय दिला आहे ज्याने असा आरोप केला होता की, इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे त्याच्या वाहनाचे नुकसान झाले.
केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाशी संबंधित ग्राहक न्यायालयाचा हा भारतातील पहिला ज्ञात आदेश आहे. आयोगाने आदेशात मारुती सुझुकी व डीलरला वाहन मालकाचा दुरुस्तीचा खर्च परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
तक्रारदाराचा दावा होता की, जानेवारी २०२३ मध्ये तयार ‘मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्ट्राँग हायब्रिड झेटा प्लस’ या वाहनात ई२० पेट्रोल भरल्यानंतर इंजिनच्या समस्या वारंवार उद्भवू लागल्या.
मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, इंधनात भेसळ असल्याचे कारण देत एका ग्राहकाचे वाहन बदलून त्याऐवजी नवीन 'ई२०' सुसंगत वाहन देण्याचे निर्देश देणाऱ्या रायपूर येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या आदेशाला कंपनी आव्हान देणार आहे.