जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

३७० कलम हटवल्यानंतरचा परिणाम
जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात कलम ३७० हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना ९१ टक्के कमी झाल्या आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ५०६३ दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या, तर २०१९ ते २०२३ दरम्यान ४३४ घटना घडल्या.

दहशतवादी व त्यांच्या साथीदारांना होणाऱ्या अटकेचे परिणाम ५ पट वाढले आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ४२७ दहशतवाद्यांना अटक झाली होती, तर

२०१९ ते २०२३ दरम्यान २३२७ दहशतवाद्यांना पकडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कलम ३७० हटवण्यापूर्वी व नंतरच्या ४ वर्षांतील गुन्हेगारी घटनांची माहिती जारी केली. २०१५ ते २०१९ दरम्यान ३२९ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला. २०१९ ते २०२३ दरम्यान १४६ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in