गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्ध सरावावर चीनने आक्षेप घेतल्याच्या बातम्या ताज्या असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील सीमा भागात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे काही सैनिक जखमी झाल्याचे समोर आले आहे.