भारत-कतार सहकार्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट; भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर मोदी-अल थानी यांची भेट

बुधवारी अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी यूएई आणि भारत यांच्यात दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
भारत-कतार सहकार्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट; भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर मोदी-अल थानी यांची भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यूएर्इत हिंदू मंदिराचे उद्घाटन करून संयुक्त अरब अमिरातचा दोन दिवसांचा दौरा संपवला व ते कतारला पोहोचले. तेथे पंतप्रधान मोदींनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. त्याआधी कतारने आठ माजी भारतीय नौदल कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा माफ करून भारतात पाठवले. यामुळे भारत आणि कतारमधील संबंध दृढ होत आहेत. आम्ही भारत-कतार संबंधांचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यामुळे चीन आणि पाकिस्तानचा जळफळाट सुरू झाला आहे.

भारत आणि कतारमध्ये व्यापार आणि ऊर्जा संबंध आता अधिक वाढीस लागले आहेत. कतार हा भारताला एलएनजीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. गेल्या काही वर्षांत भारत-कतार यांच्यातील विविध क्षेत्रातील सहकार्य सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी जून २०१६ मध्ये पहिल्यांदा दोहाला भेट दिली. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना सर्वोच्च पातळीवर गुंतवणुकीची आणि द्विपक्षीय संबंधांना नवीन चालना देण्याची संधी मिळाली. आखाती देशातील मुस्लीम देशांमध्ये भारतासोबत मैत्रीसाठी चढाओढ लागली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जगात भारताचे वर्चस्व वाढले आहे. भारत घेत असलेली भूमिका इतर देशांना देखील पटत आहे. भारतीय लोक आणि भारतीय संस्कृती यामुळे भारताचे वर्चस्व मुस्लीम देशांमध्ये वाढले आहे. दुबई, यूएईसारखे देश आता भारतासोबत घट्ट मैत्रीसाठी प्रयत्न करत आहेत.

बुधवारी अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी यूएई आणि भारत यांच्यात दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पीएम मोदींनी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन करून दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत केली आहे. दोन दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या कतार भेटीमुळे भारत आणि कतारमधील संबंधही दृढ झाले आहेत. अलीकडेच कतारने आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली, ज्यांना त्यांच्या अटकेनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारतीयांची सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतार भेट झाली. भारत आणि कतारमध्ये व्यापार आणि ऊर्जा संबंध वाढत आहेत. कतार हा भारताला एलएनजीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे.

भारताचे वर्चस्व वाढले

गेल्या काही वर्षांत भारत-कतार यांच्यातील विविध क्षेत्रातील सहकार्य सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी जून २०१६ मध्ये पहिल्यांदा दोहाला भेट दिली. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना सर्वोच्च पातळीवर गुंतवणुकीची आणि द्विपक्षीय संबंधांना नवीन चालना देण्याची संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला आखाती देशातील मुस्लीम देशांमध्ये भारतासोबत मैत्रीसाठी चढाओढ लागली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे वर्चस्व वाढले आहे. भारत घेत असलेली भूमिका इतर देशांना देखील पटत आहे. भारतीय लोक आणि भारतीय संस्कृती यामुळे भारताचे वर्चस्व मुस्लीम देशांमध्ये वाढले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in