शाहजहानकडून आदिवासींचा छळ; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रारी

आयोगाचे हे पथक आता दौऱ्यानंतर दिल्लीत परत आले असून ते आपला अहवाल दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
शाहजहानकडून आदिवासींचा छळ; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रारी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे जबरदस्तीने जमीन बळकावणे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला टीएमसी नेता शेख शाहजहान आणि त्यांचे सहकारी गरीब आदिवासी कुटुंबांकडून मनरेगाचे वेतन जबरदस्तीने घेतील आणि पक्षाच्या विरोधात मतदान केल्याबद्दल त्यांचा छळ केला जाईल, अशा आशयाच्या तक्रारी असल्याची माहिती दिसून येत आहे, असे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने म्हटले आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अनंता नायक यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथकाला तक्रारदारांनी सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहान आणि त्याच्या साथीदारांना कथितपणे संरक्षण दिले.

आयोगाचे हे पथक आता दौऱ्यानंतर दिल्लीत परत आले असून ते आपला अहवाल दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत. तो अहवाल सरकारला पाठवला जाईल. नायक यांनी तक्रारदारांच्या माहितीनुसार स्पष्ट केले की, या समितीकडे आदिवासी महिलांचा लैंगिक छळ आणि शाहजहान आणि त्याच्या साथीदारांकडून जमीन हडप केल्या असल्याबाबत ५० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नदीकिनारी असलेले संदेशखळी हे क्षेत्र- कोलकातापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर सुंदरबनच्या सीमेवर वसलेले आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चा नेता शाहजहान याच्या विरोधात एक महिन्यापेक्षा जास्त काळ निदर्शने सुरू आहेत. तो व त्याचे समर्थक फरार असून शहाजहान गरीब आदिवासी लोकांना त्यांची मनरेगाची कमाई त्याला देण्यास सांगत होता. आणि जर त्यांनी ते आधीच थकवले असेल, तर तो त्यांना सावकारांकडून पैसे उसने घेऊन त्याला देण्यास सांगे असे तक्रारींनुसार दिसून येत असल्याचे नायक यांनी स्पष्ट केले.

पॅनेलला या भेटीमध्ये असेही कळाले की, शाहजहान आणि त्याचे सहकारी स्थानिक महिलांना रात्री उशिरा बैठकीसाठी येण्यास सांगत आणि त्याच्या मागण्याचे पालन केले गेले नाही, तर त्या कुटुंबातील सदस्यांचा छळ केला गेला, असे नायक यांनी सांगितले. तो म्हणाला.

जर पीडितेने पोलिसांकडे संपर्क साधला तर ते एफआयआर किंवा तक्रार दाखल करत नाहीत उलट ते शहाजहानशी वाटाघाटी करा, असे तक्रारदारांना सांगत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना पाठीशी घातले असल्याचेही नायक यांनी सांगितले.

एनसीएसटीचे उपाध्यक्ष नायक म्हणाले. तक्रारींमध्ये एनसीएसटी टीमला असेही सांगण्यात आले आहे की आरोपी आदिवासी कुटुंबांना त्यांची जमीन त्यांना देण्यास सांगतील आणि त्यांनी विरोध केल्यास शेतात मिठाचे पाणी सोडतील, अशीही भीती घातली गेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in