‘समुद्रयान मत्स्य’ समुद्राचा तळ गाठणारअवकाश काबीज केल्यानंतर समुद्रमंथनाची योजना

सुरुवातीला ५०० मीटर खोलीवर चाचण्या घेण्यात येणार आहेत
‘समुद्रयान मत्स्य’ समुद्राचा तळ गाठणारअवकाश काबीज केल्यानंतर समुद्रमंथनाची योजना

नवी दिल्ली : अवकाशात भरारी मारून चंद्राला कवेत घेतल्यानंतर भारताने आता समुद्रमंथन करून कोबाल्ट, निकेल आणि मँगनीजसारखे मूल्यवान धातू शोधण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत पाणबुडीसदृश मत्स्य नावाचे समुद्रयान समुद्रात ६ हजार मीटर खोलीवर पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे समुद्रयान पूर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या यानाची उभारणी सुरू आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीस याची पहिली चाचणी चेन्नईजवळ बंगालच्या उपसागरात घेण्यात येणार आहे. अलीकडेच अॅटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यातील सर्व क्रू सदस्य मृत झाले होते. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ सावध झाले असून समुद्रयानाच्या कसून चाचण्या करीत आहेत. सुरुवातीला ५०० मीटर खोलीवर चाचण्या घेण्यात येणार आहेत.

चाचण्यांनंतर प्रत्यक्ष मंथनाला २०२६ साली सुरुवात होणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच अशा पाणबुड्या तयार केल्या आहेत. अशी माहिती अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव रविचंद्रन यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ४०७७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही विशेष पाणबुडी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी संस्था उभारत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in