वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना आणि मुसळधार पावसामुळे कोळसा खाणकाम व वाहतुकीत अडथळे येत असल्याने, भारतातील ४५ पेक्षा जास्त औष्णिक वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा निश्चित मानकांपेक्षा कमालीचा खाली घसरला आहे.
वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?
वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली: विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना आणि मुसळधार पावसामुळे कोळसा खाणकाम व वाहतुकीत अडथळे येत असल्याने, भारतातील ४५ पेक्षा जास्त औष्णिक वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा निश्चित मानकांपेक्षा कमालीचा खाली घसरला आहे. यामुळे इंधन उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

एकूण १४८ दशलक्ष टन कोळशापैकी सुमारे ७६ टक्के कोळसा एकतर खाणींच्या मुखाशी पडून आहे किंवा वाहतुकीदरम्यान अडकून पडला आहे. ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या प्रमुख कोळसा उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खाणकामावर परिणाम झाला असून रेल्वेद्वारे होणारे कोळसा कोळसा लोड आणि वाहतूक मंदावली आहे. दुसरीकडे विजेच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in