संभाव्य शत्रू हल्ल्याच्या संरक्षणासाठी RBI चे ओदिशात डेटा सेंटर

सीमापार संभाव्य धोके तसेच उच्च भूकंपीय जोखीम क्षेत्रांपासून देशाच्या अत्यावश्यक वित्तीय पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि मुख्य प्रणालींची अखंडता बळकट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओदिशात सुरक्षित डेटा सेंटर उभारले आहे.
संभाव्य शत्रू हल्ल्याच्या संरक्षणासाठी RBI चे डेटा सेंटर
संभाव्य शत्रू हल्ल्याच्या संरक्षणासाठी RBI चे डेटा सेंटर
Published on

नवी दिल्ली : सीमापार संभाव्य धोके तसेच उच्च भूकंपीय जोखीम क्षेत्रांपासून देशाच्या अत्यावश्यक वित्तीय पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि मुख्य प्रणालींची अखंडता बळकट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओदिशात सुरक्षित डेटा सेंटर उभारले आहे.

भुवनेश्वर येथील ग्रीनफिल्ड सुविधा मध्यवर्ती बँकेच्या चलन व्यवस्थापन, पेमेंट व सेटलमेंट ऑपरेशन्स आणि नियामक डेटा कार्यांना आधार देणाऱ्या कोअर संगणकीय प्रणालींचे होस्टिंग करणार आहे.

२०२३ मध्ये आरबीआयने खुर्दा येथील इन्फो व्हॅली-२ मध्ये १८.५५ एकरांच्या कॅम्पसवर काम सुरू केले तेव्हा स्थानाबाबत फारसे प्रश्न विचारले गेले नाहीत. मात्र लॉजिस्टिक व ऑपरेशनल बाबींपलीकडे रणनीतिक घटकांचाही विचार झाला असण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रावर लक्ष ठेवणाऱ्या एका विश्लेषकाने सांगितले.

ओदिशातील हे ठिकाण पश्चिम व उत्तर सीमेपासून दूर असल्याने सीमापार क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ल्यांचा धोका कमी होतो. तसेच हे क्षेत्र उच्च भूकंपीय जोखीम पट्ट्यांबाहेर असल्याने तीव्र भूकंपांची असुरक्षा तुलनेने कमी राहते. या घटकांमुळे ‘महत्त्वाच्या वित्तीय प्रणालींच्या सुरक्षितता व सातत्याच्या चौकटीला अधिक बळ मिळते,’ असे त्यांनी नमूद केले.

दुसऱ्या एका विश्लेषकाने निदर्शनास आणून दिले की मुंबई आणि चेन्नईत मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर एकवटलेली असताना, ओदिशा हे प्रमुख सबसी कम्युनिकेशन केबल्सचे लँडिंग पॉइंट नाही. अशा डिजिटल हब्स व दाट नेटवर्क कॉरिडॉर्सपासून दूर सुविधा उभारल्याने केंद्रित सायबर धोके आणि नेटवर्क असुरक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न आहे.

वित्तीय डेटा आता अत्यावश्यक पायाभूत सुविधा

वित्तीय डेटा आता अत्यावश्यक राष्ट्रीय पायाभूत सुविधा मानला जात असताना, आरबीआयचा हा निर्णय व्यापक धोरणात्मक संकेत देतो. मिशन-क्रिटिकल प्रणालींवर कडक संस्थात्मक नियंत्रण, बाह्य धोक्यांचा किमान संपर्क आणि अत्यंत परिस्थितीतही देशाच्या वित्तीय कण्याचे अखंड कार्य सुनिश्चित करणे,’ असे दुसऱ्या एका विश्लेषकाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in