नवी दिल्ली : केंद्रीय सशस्त्र पोलीस, आसाम रायफल व राष्ट्रीय सुरक्षा दल आदीतील १५३२ जवानांनी गेल्या १२ वर्षांत आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली. छळामुळे कोणीही आत्महत्या केलेली नाही, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, निमलष्करी दलातील जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी कृती दल स्थापन केले आहे. या कृती दलाचा अहवाल येणे बाकी आहे.