नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणारा आर्थिक लाभ वार्षिक ८ हजारांवरून १२ हजारांवर नेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने संसदेत दिले.
केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंदडा यांनी लेखी उत्तरात लोकसभेत सांगितले की शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्याही लाभामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. केंद्र सरकारने २०१९ साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती.