भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान; जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान -आ. प्रशांत ठाकूर

विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान; जगातील सामर्थ्यवान देश म्हणून भारताचा देशवासीयांना अभिमान -आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : भाजपतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरू झाले आहे. यात भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. त्या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे मुक्काम करत समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. यावेळी विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, बूथ कमिटी, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय यांना सदिच्छा भेट पाहणी केली तसेच या महत्वाच्या गरजांना कायम सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासित केले. यावेळी नवमतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते समाजातील प्रतिभावंत व्यक्ती तसेच खेळाडूंचीही त्यांनी भेट घेतली व त्यांचा सत्कारही केला. तसेच गावात फिरून त्यांनी लोकांशी संवाद केला त्यांना मोदी सरकारच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या कुटुंबीयांचा, कुस्तीपटू वरुण पाटील व पैलवान शंकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक व सुविधांबाबत डॉक्टरांशी चर्चा झाली.

यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी सरपंच वासुदेव गवते, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, सरपंच प्रकाश गडगे, उपसरपंच वंदना रोड पालकर, राम पाटील, दिनेश मानकामे, शैलेश जाधव, माजी उपसरपंच नीलिमा पाटील, कल्पना वाघे, डॉ. रोशन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सागर पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, बूथ अध्यक्ष सुनील पाटील, अमित गवते, किरण मानकामे, रामदास पाटील, गोपाल रोडपालकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मगर, सावित्री पाटील, मिलिंद पाटील, विक्रांत मस्कर, रोहन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक धोत्रे सर शाळा कमिटी सदस्य राजन पाटील, संगीता जोशी, सुनंदा कलोते, किशोर खारके, सतीश घाडगे, मयूर पाटील, विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा !

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १० वर्षातील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती या ‘गाव चलो अभियान’ मधून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले. मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रकेही यावेळी वितरित करत लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थींची भेट घेत त्यांना मिळालेल्या योजनांची माहिती घेतली तर केवायसी व इतर तांत्रिक कारणामुळे लाभ न घेऊ शकलेल्या नागरिकांनी त्याची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

logo
marathi.freepressjournal.in