Women's day Special : 'या' ५ भारतीय महिला वैज्ञानिकांविषयी माहित आहे? जाणून घ्या अधिक

Women's day Special : 'या' ५ भारतीय महिला वैज्ञानिकांविषयी माहित आहे? जाणून घ्या अधिक
X - @chaitanya_stats @ncsmgoi @Shrikant1511 @ncsmgoi @granthopasak
Published on
इरावती कर्वे - या देशातील आघाडीच्या मानववंशशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून इरावती कर्वे यांचे नाव देखील नोंदवले गेले आहे. साहित्यिक म्हणून त्यांचे स्थानही खूप उच्च मानले जाते. त्यांचा जन्म म्यानमार (बर्मा) येथे झाला. त्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी या विषयांमध्ये महत्त्वाचे संशोधन कार्य केले. इंग्रजी व्यतिरिक्त त्यांनी मराठी भाषेतही लेखन केले आहे. त्यांच्या 'युगांत' या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचे निधन झाले.
इरावती कर्वे - या देशातील आघाडीच्या मानववंशशास्त्रज्ञांपैकी एक म्हणून इरावती कर्वे यांचे नाव देखील नोंदवले गेले आहे. साहित्यिक म्हणून त्यांचे स्थानही खूप उच्च मानले जाते. त्यांचा जन्म म्यानमार (बर्मा) येथे झाला. त्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी या विषयांमध्ये महत्त्वाचे संशोधन कार्य केले. इंग्रजी व्यतिरिक्त त्यांनी मराठी भाषेतही लेखन केले आहे. त्यांच्या 'युगांत' या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ११ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचे निधन झाले.X - @granthopasak
अन्ना मणि - अन्ना मणी या एक एक प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी केरळमधील त्रावणकोर येथे झाला. सरकारी शिष्यवृत्तीवर ती हवामानशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली आणि परतल्यानंतर भारतीय हवामान विभागात काम करू लागली. त्यांनी सौर विकिरण, ओझोन थर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. १६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
अन्ना मणि - अन्ना मणी या एक एक प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी केरळमधील त्रावणकोर येथे झाला. सरकारी शिष्यवृत्तीवर ती हवामानशास्त्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली आणि परतल्यानंतर भारतीय हवामान विभागात काम करू लागली. त्यांनी सौर विकिरण, ओझोन थर आणि पवन ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. १६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचे निधन झाले.X - @ncsmgoi
जानकी अम्माल - जानकी अम्माल यांना वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळविणारी पहिली महिला म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात झाला. त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात एम.एससी. केले. आणि पीएच.डी. पदवी मिळाली. उसाच्या संकरित प्रजातींचा शोध आणि संकरित प्रजनन यावरील त्यांचे संशोधन जगभर प्रसिद्ध झाले. ७ फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.
जानकी अम्माल - जानकी अम्माल यांना वनस्पतिशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळविणारी पहिली महिला म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात झाला. त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात एम.एससी. केले. आणि पीएच.डी. पदवी मिळाली. उसाच्या संकरित प्रजातींचा शोध आणि संकरित प्रजनन यावरील त्यांचे संशोधन जगभर प्रसिद्ध झाले. ७ फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.X - @Shrikant1511
आसिमा चटर्जी - विज्ञानात डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला असिमा चॅटर्जी यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी आणि जैविक रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. त्यांनी मलेरियाविरोधी औषधांवर व्यापक संशोधन केले. २२ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांचे निधन झाले.
आसिमा चटर्जी - विज्ञानात डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला असिमा चॅटर्जी यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी आणि जैविक रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. त्यांनी मलेरियाविरोधी औषधांवर व्यापक संशोधन केले. २२ नोव्हेंबर २००६ रोजी त्यांचे निधन झाले.X - @ncsmgoi
दर्शन रंगनाथन - या एक प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म ४ जून १९४१ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्या अनेक वर्षे दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांच्या कामादरम्यान त्यांनी युरिया चक्र आणि प्रथिनांच्या रचनेवर अनेक शोध लावले. जून २००१ मध्ये त्यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
दर्शन रंगनाथन - या एक प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म ४ जून १९४१ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्या अनेक वर्षे दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांच्या कामादरम्यान त्यांनी युरिया चक्र आणि प्रथिनांच्या रचनेवर अनेक शोध लावले. जून २००१ मध्ये त्यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.X - @chaitanya_stats
logo
marathi.freepressjournal.in