

बुलावायो : पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताला आता आशिया चषकातील अंतिम फेरीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-सिक्स गटातील सामन्यात भारताची लढत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
भारताला १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले. आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारच्या सामन्यासाठी सचिन तेंडुलकरने भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करत मोलाच्या टिप्स दिल्या.