
ICC Under 19 Wome's T20 स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. क्वालालंपूर के बेयुमास ओवल स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारत भारतीय महिला संघाने अंडर-19 टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. त्रिशा गोंगाडी ही सामना आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची मानकरी ठरली आहे. तिला संपूर्ण स्पर्धेत 309 धावा आणि सात विकेट्ससाठी सामना आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
दक्षिण अफ्रिका महिला संघाची कर्णधार रेनेके हीने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा हा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडवली. भारतीय गोलंदाजांपुढे शरणांगती पत्करत दक्षिण अफ्रिकेच्या संघांने अवघ्या 82 धावांवर गाशा गुंडाळला. तर निकी प्रसादच्या नेतृत्वात खेळत असलेल्या महिला संघात गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवल्यानंतर फलंदाजांनी धावांचा पाठलाग करत अवघ्या 11.2 ओव्हरमध्ये फक्त एक विकेट गमावून वर्ल्ड कप आपल्या नावे केला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकत अंडर 19 महिला संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक ३३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या, तर सानिका चालकेनेही २२ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.
दक्षिण अफ्रिकेवर सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांचा दबाव
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व ठेवले. दक्षिण अफ्रिकेला दुसऱ्या ओव्हरमध्येच पहिला झटका दिला. पारुनिका सिसौदियाने सिमोन लॉरेन्सला क्लिन बोल्ड केले. यानंतर चौथ्या षटकात शबनम शकीलने जेम्मा बोथाला कमलिनी करवी झेलबाद केले. जेम्माने 14 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला पाचव्या षटकात 20 धावांवर तिसरा धक्का बसला. आयुषी शुक्लाने डायरा रामलकनला गोलंदाजी दिली. तिला तीन धावा करता आल्या.
यानंतर कायला रेनेके आणि काराबो मॅसिओ यांनी चौथ्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी गोंगडी त्रिशाने मोडली. त्याने रेनेकेला पारुनिकाकडून झेलबाद केले. रेनेकेला 21 चेंडूत सात धावा करता आल्या. यानंतर आयुषी शुक्लाने मेसोला बोल्ड केले. तिला 26 चेंडूत 10 धावा करता आल्या. त्यानंतर गोंगाडी त्रिशाने मिक व्हॅन वुर्स्ट आणि शेषनी नायडू यांनाही बाद केले. माईक 18 चेंडूत 23 धावा करू शकला, तर शेषनीला खातेही उघडता आले नाही.
वैष्णवी शर्माने फे क्रॉलिंग (15) आणि मोनालिसा लेगोडी (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पारुनिकाने डावाच्या शेवटच्या चेंडूवर ऍशले व्हॅन विकला बाद केले. ॲश्लीला खातेही उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील चार खेळाडूंना खातेही उघडता आले नाही यावरून भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वाचा अंदाज लावता येईल. भारताकडून गोंगडीने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शबनम शकीलला एक विकेट मिळाली.
83 धावांचे लक्ष्य भारताने सहज गाठले
अशा प्रकारे अवघ्या 82 धावा करत दक्षिण अफ्रिकेचा संघ तंबूत परतला. भारतासमोर 83 धावाचे सोपे लक्ष्य होते. हे लक्ष्य भारतीय संघाने सहजरित्या पार केले. भारताने फक्त एक गडी गमावून 83 धावाचे लक्ष्य फक्त 11.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले. कमलिनी हीने आठ धावा केल्यानंतर ती रेनेकेची बळी ठरली. भारतीय संघात त्रिशा गोंगडी हिने सर्वोत्तम प्रदर्शन केले.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच्या स्पर्धेची कामगिरी
संपूर्ण स्पर्धेत १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यापूर्वी संघाने स्पर्धेतील सहाही सामने खिशात घातले आहेत.
निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने सुरुवातीपासून अंतिम सामन्यापर्यंत स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ९ विकेटने, मलेशियाविरुद्ध १० विकेटने, श्रीलंकेविरुद्ध ६० धावांनी, बांगलादेशविरुद्ध ८ विकेटने, स्कॉटलंडविरुद्ध १५० धावांनी आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ विकेट राखून सरशी साधत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
सलामीवीर गोंगडी त्रिशा हिचा फॉर्म स्पर्धेत सर्वोत्कृष्ट राहिला. दुसरी सलामीवीर आणि डावखुरी फलंदाज जी कमालीने देखील उत्तम कामगिरी केली. सलामीवीर शानदार कामगिरी करत असल्याने भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना संधी मिळाली नाही. भारताच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला या दोघी विकेट्सच्या यादीत आघाडीवर आहेत.
अंडर 19 T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्रिशा गोंगाडी सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंग ठरत आहे. तिच्यावर तिच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.