Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत

गणेशपुरी परिसरातील प्रसिद्ध अकलोली गरम पाण्याच्या कुंडाजवळ तानसा नदीत बुडून विरार येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला.
Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत
Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत
Published on

दानिश आझमी/भिवंडी : गणेशपुरी परिसरातील प्रसिद्ध अकलोली गरम पाण्याच्या कुंडाजवळ तानसा नदीत बुडून विरार येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरुण राम बच्चन चौहान (१३) आणि त्याचा धाकटा भाऊ आयुष राम बच्चन चौहान (१०) अशी आहेत. विरार येथे रिक्षाचालक असलेले त्यांचे वडील राम बच्चन चौहान हे पत्नी, दोन मुलगे आणि एका लहान मुलीसह प्रसिद्ध अककोली येथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी आले होते. त्यानंतर हे कुटुंब तानसा नदीच्या जवळच्या किनाऱ्यावर गेले. यावेळी दोन्ही भाऊ नदीत उतरले. पाण्यात आंघोळ करताना ते नदीच्या अधिक खोल भागाकडे गेले.

पोलीस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, नदीला यावेळी जोरदार प्रवाह असून पाण्याची खोलीही मोठी होती. दोन्ही मुलांचा पाण्यात तोल गेल्याने ते बुडू लागले.

स्थानिक तरुणांनी तत्काळ नदीत उतरून शोधमोहीम सुरू केली. सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही भावांना त्यांनी नदीतून बाहेर काढले. ते ज्या ठिकाणी नदीत उतरले होते, त्यापासून काही अंतरावर दोघांचे मृतदेह आढळून आले.

Thane : तानसा नदीत सख्ख्या भावांचा अंत
Thane : खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in