प्रेमासाठी आईनेच केली दोन चिमुकल्यांची हत्या

अलिबाग येथील किहिम गावातील एक मुलगी (५) व एक मुलगा (३) ही बेशुद्ध झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी सदरची मुले मयत झाल्याचे घोषित केले.
प्रेमासाठी आईनेच केली दोन चिमुकल्यांची हत्या

अलिबाग : अलिबाग येथील मांडवा पोलीस ठाण्यात ३१ मार्च रोजी एका पाच वर्षीय मुलीची तसेच तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना आईने आपल्या पूर्व प्रेमसंबंधांत मुलांचा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आईला अटक करण्यात आली आहे.

अलिबाग येथील किहिम गावातील एक मुलगी (५) व एक मुलगा (३) ही बेशुद्ध झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी सदरची मुले मयत झाल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदरचे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे. जे. हॉस्पिटल मुंबई याठिकाणी पाठविण्यात आली.

सदर घटनेप्रसंगी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मुलांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसावा व त्यांना घातपात करून ठार मारले असावे असा दाट संशय आला त्यामुळे सदर अँगलमधून चौकशी करण्यात आली. त्यावेळी चौकशीमध्ये अशी माहिती मिळाली की, मयत मुलांचे वडील सदानंद पोले हे घटनेच्या दिवशी दुपारी बाजूच्या गावामध्ये आठवडी बाजाराकरिता गेले होते. ते सायंकाळी परत आल्यानंतर त्यांनी मयत मुलांची आई शीतल पोले हिच्याकडे विचारणा केली असता मुले झोपली असल्याचे तिने सांगितले.

मुलांना उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुले बेशुद्ध असल्याचे निदर्शनास आले असल्याचे पोलीस तपासात समोर आले, मात्र याप्रकरणी अधिक चौकशी केली असता मयत मुलांची आई शीतल पोलेचे एक मुलाबरोबर विवाह होण्यापूर्वी प्रेमसंबंध होते व ते दोघेही वेळोवेळी भेटत होते. त्यावरून शीतल आणि सदानंद पोले यांच्यात वारंवार भांडणे होत हाती. यावरून अधिक तापस केला असता शीतलने आपल्या मुलांची नाक व तोंड दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले.

विवाहपूर्व संबंधांमुळे मुलांचा खून

शीतल पोलेचे विवाहापूर्वी साईनाथ जाधवबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात शीतलने साईनाथला विवाह करू दिला नव्हता. त्याच शीतलला साईनाथसोबत पळून जाऊन विवाह करून त्याच्यासोबत वास्तव्य करायचे होते. मात्र हे करत असताना तिला आपली दोन मुले अडसर वाटत होती. त्यामुळे तिने प्रियकराच्या प्रेमापोटी व स्वतःच्या खुशीसाठी पती बाजारात गेल्याची संधी साधून दोन्ही चिमुकल्यांचा नाक व तोंड दाबून निर्दयीपणे खून केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in