अंबरनाथ तालुक्यातील पर्यटनावर निर्बंध घालणारे आदेश मागे घेण्यात यावे - किसन कथोरे

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटनस्थळी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवता येऊ शकतो
अंबरनाथ तालुक्यातील पर्यटनावर निर्बंध घालणारे आदेश मागे घेण्यात यावे - किसन कथोरे

पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर व बारवी डॅम परिसरात पर्यटनावर निर्बंध घालणारे आदेश मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर परिसरातील धामनवाडी, तारवाडी, भोज, व-हाडे, दहिवली मळीचीवाडी हा परिसर व चांदप गावचे हद्दीत बारबी डॅम परीसरात बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते चारवी डॅम गेट नं. ३ येथील ३ कि.मी च्या परिसरात पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांत नाराजीचा सूर आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी या पावसाळी पर्यटनावरील बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.

पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटनस्थळी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवता येऊ शकतो. यापूर्वी कोंडेश्वरला पर्यटक बुडण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

मात्र याठिकाणी एक बोट व चार पोहणारे लोक कायमस्वरूपी नेमून नागरिकांना पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील. यादृष्टीने कोंडेश्वर, बारवी डॅम परिसर व इतरत्र पावसाळी पर्यटनावर घातलेली बंदी उठवावी, अशी आपली मागणी असल्याचे किसन कथोरे यांनी सांगितले.

पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळाला पाहिजे, हीच यामागची आपली भूमिका असल्याचे कथोरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in