कंटेनरला लागलेल्या आगीत सहा बकऱ्यांचा मृत्यू

या आगीत सहा बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
कंटेनरला लागलेल्या आगीत सहा बकऱ्यांचा मृत्यू

ठाणे : पारसिक रेतीबंदर येथे विसर्जन घाटाजवळ ठेवण्यात आलेल्या कंटेनरच्या केबिनला मध्यरात्री आग लागली. या आगीत सहा बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. गणपती विसर्जन दरम्यान साहित्य ठेवण्यासाठी महापालिकेमार्फत कंटेनर ठेवण्यात आले होते. त्यामध्ये निर्मल महातो (३५) या इसमाने कंटेनरमध्ये बकऱ्या पाळल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कंटेनरमध्ये आग लागली. आग लागल्याचे समजताच महातो याने पळ काढला. जवळपास पावणेदोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत १ दुचाकी, ३ सिलेंडर,३ जनरेटर, १ कलर कॉम्प्रेसर, वेल्डिंग लोखंडी साहित्य, लाकडी फळ्या जळून खाक झाल्या. तर कंटेनरमध्ये असलेल्या ६ बकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in