स्मार्ट सिटीची चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता

स्मार्ट सिटीची चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता

भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच राबवण्यात येत असून केंद्राच्या स्मार्ट चौकशीवरून भाजपमध्ये फूट पडली असल्याचे चित्र होते.

अडीज वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. काही महिन्यापूर्वी ठाण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन केली होती. ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बहुतांशी महत्वाचे प्रकल्प भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच राबवण्यात येत असून केंद्राच्या स्मार्ट चौकशीवरून भाजपमध्ये फूट पडली असल्याचे चित्र होते. दरम्यान आता राज्यात सत्ताबदल झाला असल्याने ठाणे पालिकेतील सत्तेची समीकरणेही बदलणार असल्याने स्मार्ट सिटीची चौकशी गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील बहुतांशी कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. बहुसंख्य कामे संथपणे -सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपच्या वतीने राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पत्की केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार केली होती, आणि पुरी यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.स्मार्ट सिटीची जी कामे सुरु आहेत त्या संदर्भात काही माहिती केंद्र सरकारने मागितली होती ती माहिती फेब्रुवारी महिन्यातच पाठवली असल्याचे पालिकेने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in