ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद

शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे
ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम एम.आय.डी.सी ने घेतले आहे.

परिणामी, शुक्रवार दिनांक पाच अॅागस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० ते सायं. ८.०० वाजेपर्यत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यत (किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. पाणीपुरवठा िवभागाने पाणी कमी दाबाने येणार असल्याचे आधीच सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in