ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! २४ तास बंद राहणार पाणीपुरवठा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! २४ तास बंद राहणार पाणीपुरवठा
प्रातिनिधिक फोटो
Published on

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे परिसरात येत्या गुरुवार ते शुक्रवार असा २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

सदर शटडाऊन कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.२६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं.२, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २५ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in