अक्षररंग

वेळच्या वेळी

घरी येऊन पाहतो तर, राजाचा हुकूम आला रणभूमीवर युद्धासाठी, बोलावले होते त्याला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

एक सरदार घोड्यावर,

दूरवर फिरून आला

फिरताना त्याच्या घोड्याचा,

नाल निखळून गेला

माझ्या पुढ्यात एवढे काम,

वेळ आहे कुणाला

केव्हातरी मारू नाल,

सरदार मनात म्हणाला

घरी येऊन पाहतो तर,

राजाचा हुकूम आला

रणभूमीवर युद्धासाठी,

बोलावले होते त्याला

घोड्यावर तो स्वार होऊन,

रणभूमीवर आला

घोडा मात्र वेगाने,

आज पळेनासा झाला

नाल नाही खुराला,

घोडा हळूच चालला

सरदाराचा चाबूक,

घोड्याशी खूप बोलला

वेग मंदावला घोड्याचा,

सरदार मागे राहिला

शत्रूच्या हाती सापडून,

अखेर बंदिवान झाला

म्हणून कुठल्याही गोष्टीचा,

वेळीच विचार करावा

वेळच्या वेळी कामाचा,

सतत आग्रह धरावा

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात