अक्षररंग

वेळच्या वेळी

घरी येऊन पाहतो तर, राजाचा हुकूम आला रणभूमीवर युद्धासाठी, बोलावले होते त्याला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

एक सरदार घोड्यावर,

दूरवर फिरून आला

फिरताना त्याच्या घोड्याचा,

नाल निखळून गेला

माझ्या पुढ्यात एवढे काम,

वेळ आहे कुणाला

केव्हातरी मारू नाल,

सरदार मनात म्हणाला

घरी येऊन पाहतो तर,

राजाचा हुकूम आला

रणभूमीवर युद्धासाठी,

बोलावले होते त्याला

घोड्यावर तो स्वार होऊन,

रणभूमीवर आला

घोडा मात्र वेगाने,

आज पळेनासा झाला

नाल नाही खुराला,

घोडा हळूच चालला

सरदाराचा चाबूक,

घोड्याशी खूप बोलला

वेग मंदावला घोड्याचा,

सरदार मागे राहिला

शत्रूच्या हाती सापडून,

अखेर बंदिवान झाला

म्हणून कुठल्याही गोष्टीचा,

वेळीच विचार करावा

वेळच्या वेळी कामाचा,

सतत आग्रह धरावा

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण