अक्षररंग

वेळच्या वेळी

घरी येऊन पाहतो तर, राजाचा हुकूम आला रणभूमीवर युद्धासाठी, बोलावले होते त्याला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

एक सरदार घोड्यावर,

दूरवर फिरून आला

फिरताना त्याच्या घोड्याचा,

नाल निखळून गेला

माझ्या पुढ्यात एवढे काम,

वेळ आहे कुणाला

केव्हातरी मारू नाल,

सरदार मनात म्हणाला

घरी येऊन पाहतो तर,

राजाचा हुकूम आला

रणभूमीवर युद्धासाठी,

बोलावले होते त्याला

घोड्यावर तो स्वार होऊन,

रणभूमीवर आला

घोडा मात्र वेगाने,

आज पळेनासा झाला

नाल नाही खुराला,

घोडा हळूच चालला

सरदाराचा चाबूक,

घोड्याशी खूप बोलला

वेग मंदावला घोड्याचा,

सरदार मागे राहिला

शत्रूच्या हाती सापडून,

अखेर बंदिवान झाला

म्हणून कुठल्याही गोष्टीचा,

वेळीच विचार करावा

वेळच्या वेळी कामाचा,

सतत आग्रह धरावा

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन