बिझनेस

आयटी इंजिनिअरना वर्षाला ४ लाखांपासूनचे पॅकेज; कॉग्निझंटकडून सोशल मीडियावरील अपप्रचाराचा समाचार

महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन लगेचच कंपन्यांमध्ये रूजू होणाऱ्या आयटी उमेदवारांना वर्षाला ४ लाख ते १२ लाख रुपयेपर्यंत वेतन दिले जाते, असा दावा आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी कॉग्निझंटने केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण घेऊन लगेचच कंपन्यांमध्ये रूजू होणाऱ्या आयटी उमेदवारांना वर्षाला ४ लाख ते १२ लाख रुपयेपर्यंत वेतन दिले जाते, असा दावा आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी कॉग्निझंटने केला आहे.

कॉग्निझंट कंपनी फ्रेशर आयटी इंजिनिअरना वर्षाला अवघा २.५२ लाख रुपये पगार देत असल्याबद्दलची चर्चा सोशल मीडियावरून सुरू आहे. मात्र नमूद करण्यात आलेले वेतन हे अभियांत्रिकी शिक्षण न घेणाऱ्या उमेदवारांसाठी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एक टक्क्याहून कमी वार्षिक पगारवाढ केल्याबद्दलही कंपनी वादाच्या फेऱ्यात सापडली आहे. मात्र वैयक्तिक कामगिरीच्या आधारे कंपनीने १ ते ५ टक्क्यांची वार्षिक पगारवाढ कमी केली असल्याचे सांगितले जाते. कॉग्निझंट कंपनी दरवर्षी नवीन इंजिनिअर तसेच आणि बिगर-इंजिनिअरिंग/आयटी पदवीधरांना विविध पदावर नियुक्त करत असते.

या दोन्ही प्रकारच्या उमेदवाराकरिता भरतीप्रकिया समांतर स्तरावर सुरू असताना तीन वर्षांच्या नॉन-इंजिनिअरिंग/माहिती तंत्रज्ञान पदवीधारकांसाठी नियुक्ती करण्यात आली. तसेच फ्रेशरसाठी कॉग्निझंटचे पॅकेज म्हणून मोठ्या प्रमाणावर सामायिक केले गेले आहे.

कॉग्निझंटने म्हटले आहे की, अभियांत्रिकीचे शिक्षण न घेणाऱ्या उमेदवारांबाबत आमची अलीकडील रोजगारविषयक नियुक्ती ही तीन वर्षांच्या पदवीधारकांसाठी असल्याने कंपनीबद्दल चुकीची माहिती प्रसारित होत आहे. वार्षिक २.५२ लाख रुपयांचे वेतन हे केवळ ३ वर्षांची पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी होते. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी कंपनी वर्षाला ४ ते १२ लाख रुपये पॅकेज देते, असेही समर्थन करण्यात आले आहे.

कॉग्निझंट नॉन-इंजिनिअरिंग अंडरग्रॅज्युएट पदवीधारकांना प्रशासकीय आणि इतर भूमिकांसाठी नियुक्त करते आणि त्यांची कौशल्ये आणि आयटी प्रशिक्षण श्रेणीसुधारित करण्यासाठी बराच वेळ आणि पैसा गुंतवते, त्यानंतर ते विविध भूमिकांमध्ये सामील होतात.

सर्वाधिक वेतनवाढ देणाऱ्या कंपन्यांमध्ये कॉग्निझंट कंपनी देशातील चौथी मोठी कंपनी आहे. कंपनीतील एकूण ३.३६ लाख कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक कर्मचारी हे भारतातील मोठ्या तसेच निमशहरांमध्ये आहेत.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन