संग्रहित फोटो  
बिझनेस

वाहन उद्योगाने जागतिक दर्जाची सर्वोत्तम पद्धती भारतात आणावी; स्वच्छ गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करा- पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

वाहन उद्योगाने जागतिक दर्जाची सर्वोत्तम पद्धती भारतात आणावी तसेच ग्रीन आणि क्लीन मोबिलिटीवरही काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

Swapnil S

नवी दिल्ली : वाहन उद्योगाने जागतिक दर्जाची सर्वोत्तम पद्धती भारतात आणावी तसेच ग्रीन आणि क्लीन मोबिलिटीवरही काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या वार्षिक अधिवेशनाला दिलेल्या लेखी भाषणात मोदी म्हणाले की, मागणी वाढेल आणि ऑटोमोटिव्ह उद्योग आणखी आणखी आर्थिक विकास करेल. आम्ही २०४७ पर्यंत विकसित भारताच्या आमच्या सामूहिक उद्दिष्टाकडे वळत असताना मला विश्वास आहे की, सियाम सारख्या संस्था सर्व भागधारकांना एकत्र आणत राहतील आणि ही संघटना आणखी मोठी होईल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, पुढील वाटचाल देशाची प्रगती जलद गतीने होणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत देखील आहे. हरित आणि स्वच्छ गतिशीलतेवर काम करणे हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, भारत आणि जग गंभीर स्थितीतून जात असून आपल्या वाहन उद्योग क्षेत्राने इतरांसाठी केवळ एक उदाहरण प्रस्थापित करणे आवश्यक नाही, तर जागतिक सर्वोत्तम पद्धती भारतात आणण्यासाठी कार्य करणे देखील आवश्यक आहे. मला विश्वास आहे की या दरम्यान झालेल्या चर्चा आणि विचारविमर्श वार्षिक अधिवेशन यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल,” ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, इनोव्हेशन आणि एंटरप्राइझद्वारे, मला खात्री आहे की, ऑटोमोटिव्ह उद्योग आणखी उच्च आर्थिक विकास करेल आणि मागणी वाढून भरभराट होईल. गेल्या दशकात भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात प्रचंड आणि अभूतपूर्व वाढ झाली आहे. आमच्या देशाच्या विस्तारत असलेल्या आर्थिक विकासाचा हा जितका पुरावा आहे, तितकाच तो ऑटोमोटिव्ह उद्योगाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आहे, असे मोदी म्हणाले.

येथे सियाम या उद्योग संस्थेच्या ६४ व्या वार्षिक सत्रात टेकुची म्हणाले की, भारताने जागतिक निर्यातील वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून आज भारतातून मारुती सुझुकीची निर्यात तिप्पट झाली आहे. तसेच पुढील सहा वर्षांत आमची निर्यात आजच्या तीनपट होईल. कंपनी आधीच काही वाहने परत जपानला निर्यात करत आहे, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहन फ्रॉन्क्सची जपानला निर्यात सुरू केली. गुजरातच्या पिपावाव बंदरातून १.६०० हून अधिक वाहनांची पहिली खेप जपानसाठी रवाना झाली. एमएसआयची निर्यात आर्थिक वर्ष २१ आणि आर्थिक वर्ष २४ दरम्यान १,८५,७७४ युनिट्सनी वाढली आहे.

ते म्हणाले की, देशांतर्गत बाजारपेठेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर कारमध्ये करण्याचा विचार आहे. इलेक्ट्रिक आणि मजबूत हायब्रीड कार व्यतिरिक्त कंपनी बायो-इंधन आणि हायड्रोजनच्या आसपास मॉडेल विकसित करण्याकडे देखील लक्ष देईल, असे त्यांनी नमूद केले.

मारुती सुझुकी ईव्ही क्षेत्रात प्रवेश करण्यास सज्ज; २०३० पर्यंत लक्षणीय निर्यातवाढीचे उद्दिष्ट

मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) २०३० पर्यंत विदेशातील निर्यातीत लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत आहे, असे एमडी आणि सीईओ हिसाशी टेकुची यांनी मंगळवारी सांगितले. तसेच कंपनी ५०० किमीची रेंज असलेली आणि ६० किलोवॅटची बॅटरी असणारी ईव्ही सादर करण्यास सज्ज आहे. देशालाही ईव्हीची गरज आहे, कारण केवळ उत्पादन क्षेत्रच तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करू शकते आणि भारताला विकसित राष्ट्र बनवू शकते, असे ते म्हणाले.

नालेसफाई : अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य - BMCचा इशारा; ५७ दिवसांत साडेनऊ लाख मेट्रिक टन गाळ उपशाचे लक्ष्य

भोंदू खरातचे वजन घटले, प्रकृतीही खंगली; बारावा गुन्हा दाखल, त्यात ८ गुन्हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक, जादूटोण्याशी संबंधित

बारामती 'बिनविरोध'चा मार्ग खडतर; काँग्रेस उमेदवार देण्यावर ठाम, सुनेत्रांची उद्धवना विनंती

मुंबईला वाचवण्यासाठी जनआंदोलनच हवे!पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे आवाहन

Iran vs US-Israel War : बेपत्ता वैमानिकासाठी शोधमोहीम तीव्र; शत्रूच्या वैमानिकाला पकडण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर