भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये एकमत 
बिझनेस

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात; बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये एकमत

भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात आला असून, बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होत असल्याचे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करार अंतिम टप्प्यात आला असून, बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होत असल्याचे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत पाच फेऱ्यांची चर्चा पूर्ण झाली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दोन्ही देश करारातील भाषिक तपशील निश्चित करत आहेत. व्यवहार पूर्ण होण्याच्या खूप जवळ आलो आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, आणि उर्वरित मुद्द्यांवर फारसे मतभेद उरले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

चर्चा सुरळीतपणे पुढे चालू आहेत आणि नवीन कोणतेही अडथळे उभे राहत नाहीत. बहुतेक सर्व मुद्द्यांवर आम्ही एकत्र आलो आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराच्या चर्चेत सकारात्मक प्रगती होत आहे आणि निकट भविष्यात न्याय्य आणि संतुलित करार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय प्रतिनिधीमंडळ गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये तीन दिवसीय व्यापार चर्चेसाठी गेले होते. या चर्चा १७ ऑक्टोबर रोजी संपल्या.

यंदा फेब्रुवारीत भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना द्विपक्षीय व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. कराराच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता २०२५ च्या शरद ऋतूपर्यंत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीबद्दल विचारले असता, अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘आम्ही आशावादी आहोत.’ गेल्या महिन्यात गोयल यांनी न्यूयॉर्कमध्ये व्यापार चर्चेसाठी अधिकृत प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले होते. हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

१६ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे दक्षिण व मध्य आशियासाठी सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्या बैठकीत दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर परस्पर फायद्याचा करार करण्याचा निर्धार केला.या प्रस्तावित कराराचा उद्देश २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १९१ अब्ज अमेरिकन डॉलरवरून वाढवून ५०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचा आहे. २०२४-२५ मध्ये अमेरिकेने चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून स्थान कायम ठेवले.

भारताची निर्यात घटली

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात अमेरिकेकडून लादलेल्या उच्च शुल्कामुळे भारताची अमेरिकेला निर्यात ११.९३ टक्क्यांनी घटून ५.४६ अब्ज डॉलरवर आली, तर आयात ११.७८ टक्क्यांनी वाढून ३.९८ अब्ज डॉलर झाली.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती