मनोरंजन

नाना पाटेकर, तनुश्री दत्ता यांच्यातील वाद पुन्हा ऐरणीवर? तनुश्री दत्ता म्हणाली...

तनुश्रीने नुकताच आदिल खानसोबत प्रसार माध्यमांशी संवद साधला यावेळी तिने राखीवर गंभीर आरोप केले आहेत.

नवशक्ती Web Desk

गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान यांच्यात वाद सुरु आहेत. आता या वादात तनुश्री दत्ता यांनी उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच आदिल खानसोबत प्रसार माध्यमांशी संवद साधला यावेळी तनुश्रीने राखीवर गंभीर आरोप केले. राखीमुले दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप तनुश्रीने राखी सावंतवर केला. यावेळी तीने मीटुबद्दल बोलताना नाना पाटेकरांवर देखील गंभीर आरोप केले.

या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताला विवेक अग्निहोत्री आणि नाना पाटेकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने हे आरोप केले. "ज्या लोकांमुळे तुझ करिअर खराब झालं. त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात नाना पाटेकर आहेत", असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. यावेळी तिने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहेत.

तमुश्री दत्ता म्हणाली, "नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत आपण का बोलत आहोत?त्यांच्यावर बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. त्यांना आजही त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझी गरज पासते. नाना पाटेकरांबरोबर माझ २००८ मध्ये बांडण झालं होतं. तेव्हा देखील त्यांच्या चित्रपट चालला नव्हता. त्यांचे चित्रपट चालत नाहीत. तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येतात. जेणेकरुन, मी त्यांच्या चित्रपटात आयटम साँग करेन आणि त्यांचे चित्रपट चालतील."

मीडिया तनुश्रीला त्यांच्या चित्रपटांबाबत काही प्रश्न विचारेल आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. त्यांच्या चित्रपटाला मला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही, असंही तनुश्री म्हणाली.

'विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त...'; राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत गोंधळ, कामकाज काही काळ ठप्प

CJP Protest : 'आक्षेपार्ह पोस्ट हटवा'; दिल्ली पोलिसांची X ला नोटीस

Mumbai : आक्षेपानंतरही सेव्हन हिल्सचा प्रस्ताव मंजूर; सुधार समितीत खासगीकरणाला विरोधकांचा विरोध

Mumbai : सत्ताधारी-विरोधकांच्या सेवेत महागड्या गाड्या; सभागृह नेते, विरोधी पक्षनेत्यांना मिळणार नव्या कोऱ्या इनोव्हा

नवी मुंबईतील १२,६८७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेचे पाऊल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा