Photo : X
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्तांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश

भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या एका नाजूक वळणावर आले असून बांगलादेश सरकारने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले. या 'अर्जंट कॉल'मुळे दोन्ही देशांमधील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Swapnil S

ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या एका नाजूक वळणावर आले असून बांगलादेश सरकारने भारतातील आपले उच्चायुक्त रियाझ हमिदुल्लाह यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले. या 'अर्जंट कॉल'मुळे दोन्ही देशांमधील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने रियाझ हमिदुल्लाह यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीने ढाका येथे पाचारण केले. हे आदेश इतके तातडीचे होते की, हमिदुल्लाह यांना अवघ्या काही तासांतच दिल्ली सोडावी लागली. ते सोमवारी रात्रीच ढाका येथे पोहोचले आहेत. सामान्यतः जेव्हा एखाद्या देशाच्या दूताला 'अर्जंट' बोलावले जाते, तेव्हा त्याचा अर्थ काहीतरी मोठा धोरणात्मक निर्णय किंवा निषेध व्यक्त करणे असा असतो. हमिदुल्लाह यांना परत बोलावणे, हा भारतासाठी एक 'राजनैतिक संदेश' दिला जात असल्याचे मानले जात आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; मातृत्व रजेसाठी दत्तक मुलाच्या वयाची अट रद्द

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी, शहांची घेतली भेट; महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा

राहुल गांधी यांच्या वर्तनावर नाराजी, आत्मपरीक्षणाचा सल्ला; माजी लष्करी अधिकारी, निवृत्त न्यायाधीशांचे थेट पत्र

Mumbai : पाणीप्रश्नी पालिकेत विरोधकांना बोलण्यास मज्जाव; निवेदनाची प्रत वाटप न केल्याचे दिले कारण

LPGची टंचाई नाही! छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती; राज्यात इंधन पुरवठा सुरळीत