आंतरराष्ट्रीय

सौदीतील अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू

पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

रियाध : पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.“सौदी अरेबियाच्या पश्चिम क्षेत्रातील जिझान येथे झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारताचे वाणिज्य दूतावास याप्रकरणी पूर्ण सहकार्य करत आहे. पुढील चौकशीसाठी हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे,” असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “या अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल जाणून घेतल्याबद्दल दुःख झाले. जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाशी संपर्क झाला आहे.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन