आंतरराष्ट्रीय

सौदीतील अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू

पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

रियाध : पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.“सौदी अरेबियाच्या पश्चिम क्षेत्रातील जिझान येथे झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारताचे वाणिज्य दूतावास याप्रकरणी पूर्ण सहकार्य करत आहे. पुढील चौकशीसाठी हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे,” असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “या अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल जाणून घेतल्याबद्दल दुःख झाले. जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाशी संपर्क झाला आहे.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार