लाईफस्टाईल

काय होईल, जर एक महिना साखर खाल्लीच नाही? आताच जाणून घ्या होणारे बदल

थोडा विचार करून बघा, जर तुम्ही एक महिना साखर पूर्णपणे बंद केली, तर काय होईल? अनेकांना वाटतं, साखर टाळणं म्हणजे फक्त वजन कमी करणं. पण विज्ञान सांगतं काहीतरी वेगळंच...

Mayuri Gawade

आपले दैनंदिन जीवन हे अनेक वेळा चहा, कॉफी, मिठाई किंवा बेकरी पदार्थांशिवाय अपूर्ण वाटते. साखर ही त्यामध्ये महत्त्वाचा घटक असते. पण एखाद्या पदार्थामध्ये सहजपणे मिसळणारी आणि चव वाढवणारी ही साखर आपल्या शरीरावर काय परिणाम करत आहे, याचा आपण खूप कमी वेळा विचार करतो.

साखरेमुळे वाढणाऱ्या समस्या

जास्त साखर खाल्ल्यामुळे वाढलेले वजन, फॅटी लिव्हर, मधुमेहाचा धोका, त्वचेसंबंधी समस्या, थकवा आणि लक्ष न लागणं यासारख्या समस्या उद्भवतात.

पण, जर एखाद्याने ठरवले की एक महिना साखर पूर्णपणे बंद करायची, तर? याच विषयावर प्रसिद्ध हेल्थ एक्स्पर्ट डॉ. सेठी (Dr. Sethi) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं आहे की, "जर एखाद्याने ठरवले की एक महिना साखर पूर्णपणे बंद करायची, तर त्याचे शरीरावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतात."

त्यांच्या माहितीनुसार, हे पाऊल शरीरासाठी एक नवा टर्निंग पॉइंट ठरू शकते. साखर बंद केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते, विशेषतः फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांना याचा विशेष फायदा होतो. मूत्रपिंडांचे कार्य सुधारते, हृदयावरील ताण आणि शरीरातील सूज (inflammation) हळूहळू कमी होते.

तसंच, साखर कमी केली तर मेंदू अधिक सुस्पष्ट काम करू लागतो. लक्ष लागायला मदत होते, आणि थकवा कमी जाणवतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण साखर ही पांढऱ्या रक्तपेशींना कमकुवत करत असते. तसेच, शरीरात झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखे महत्त्वाचे खनिज अधिक टिकून राहतात.

म्हणूनच, जर खरंच तुम्हाला आरोग्य सुधारायचे असेल, तर फक्त एक पाऊल उचलून बघा, साखर टाळा आणि फरक स्वतः अनुभवा!

(Disclaimer: ही माहिती डॉ. सेठी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड